https://drive.google.com/file/d/1a_0uy12l-Gk_fNJWDW
_N_NHs0pPhFFpK/view?usp=drivesdk
********************************
*@ १ एप्रिल @*
*रिजर्व बँक स्थापना दिन* ********************************
स्थापना - १ एप्रिल १९३५
आज आपण रिझर्व बँकेची कल्पना करतो. देश स्वतंत्र झाला नव्हता तेव्हा बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या शोधनिबंधात भारतात रिझर्व बँकेची कल्पना केली होती. आज आपण संघीय क्षेत्राबद्दल बोलतो, वित्त आयोग, राज्यांची मागणी असते, इतके पैसे कोण देईल, कोणते राज्य कोणत्या क्रमाने चालेल. देश स्वतंत्र होण्यापूर्वी बाबासाहेब आंबेडकरांनी हे विचार मांडले होते.
वित्त आयोगाचा, संपत्तीची वाटणी केंद्र आणि राज्यांमध्ये कशी असावी याचे सखोलपणे त्यांनी विचार मांडले होते आणि त्याच विचारांच्या प्रकाशात आज हा वित्त आयोग, मग ती आरबीाआय असो, अशा अनेक संस्था आहेत.
रिजर्व बँक हि एक केंद्रीय बँकिंग संस्था आहे जी भारतीय चलन विषयक नियमावली आणि आर्थिकनीती वर नियंत्रण ठेवते तसेच भारत सरकारच्या उन्नती आणि विकास कामाच्या योजना ठरवते. भारतीय वित्त व्यवस्थेवर नियंत्रण तसेच महत्वाचे निर्णय घेते.
रिजर्व बँक १ एप्रिल १९३५ साली ब्रिटीश राजवटीत स्थापन झाली. १९३५ साली स्थापन झालेल्या रिजर्व बँक ऑफ इंडिया च्या संकल्पनेत बाबासाहेबांच्या पुस्तकावर आधारित असलेल्या हिल्टन कमिशनच्या रिपोर्ट चा आधार घेण्यात आला.
रिजर्व बँक ऑफ इंडिया हि संपूर्णपणे डॉ. बाबासाहेबांच्या विचारावर, आणि त्यांनी आखून दिलेल्या रूपरेषा आणि संकल्पनेवर सुरळीतपणे अव्याहत सुरु आहे. बाबासाहेबांनी 'प्रॉब्लेम ऑफ रुपी' मध्ये केलेलं विवेचन इतकं जबरदस्त होतं की, ब्रिटीश सरकारने वसाहतवादाच्या नावाखाली भारतातील परंपरागत व्यवसायांचं चालवलेलं शोषण जगासमोर उघडं पाडलं. तत्कालीन काँग्रेसने आंबेडकरांच्या या मांडणीला उचलून धरत ब्रिटीशांना ताणून धरलं. त्याचीच परिणीती लंडनहून एकुण प्रकरण तपासण्यासाठी रॉयल कमिशनच्या स्थापनेत झाली.
१९३५ साली पहिल्या महायुद्धानंतर ब्रिटीश राजवटीतील भारतीय अर्थ व्यवस्था सुरळीत राहावी म्हणून रिजर्व बँक ऑफ इंडिया स्थापन करण्याचे ठरले, जी भारतातील इतर वित्तीय संस्था आणी बँकांवर अंकुश ठेवून कारभार सुरळीत चालू राहील.
रिजर्व बँक १९२५ साली भारतात नेमलेल्या रॉयल कमिशन म्हणजेच हिल्टन कमिशन च्या रिपोर्ट आणि तपशिला वरून बनवण्यात आली. बाबासाहेबांनी लिहिलेल्या तीनही आर्थिक ग्रंथांचा उपयोग करून तसेच त्यांच्या संकल्पना आणि कामकाजाची पद्धत रिजर्व बँकेच्या स्थापनेचा पाया ठरला.
१९४९ साली रिजर्व बँक हि अधिकृत आणि संपूर्णपणे भारत सरकारच्या अंमलाखाली आहे. १९३५ मध्ये जेव्हा रिजर्व बँकेची स्थापना झाली तेव्हा बाबासाहेब सक्रिय राजकारणात सहभागी होते, मोर्चे-आंदोलने पक्ष बांधणी अशी धावपळ सुरु होती. याच वर्षी बाबासाहेब विधी महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणून नियुक्त झाले. याच वर्षी रमाई बाबासाहेबांना सोडून गेली. याच वर्षी बाबासाहेबांनी येवला नाशिक इथे मोठी सभा घेतली आणि "मी हिंदू म्हणून मरणार नाही!" अशी प्रतिज्ञा घेतली आणि याच वर्षी बाबासाहेबांचा दस्तावेज-ग्रंथ मात्र रिजर्व बँकेचा पाया रचण्यासाठी वापरले जात होते.
इतर देशात अर्थ व्यवस्था ढासळत असताना सुद्धा बाबासाहेबांनी सुचवलेले मार्गदर्शक तत्वे आणि कार्यप्रणाली वर आज सुद्धा भारतीय रिजर्व बँक आणि भारतीय अर्थव्यवस्था डौलाने उभी आहे.
भारतीय रिजर्व बँक च्या स्थापनेत जरी बाबासाहेब नसले तरी संकल्पना आणि रूपरेषा बाबासाहेबांनी दिलेली आहे हे विकिपीडिया या सोशल साईट ने दिले आहे. परंतु बँकेच्या अधिकृत वेब साईट वर हि माहिती कुठेही नाही हि शोकांतिका आहे.
*संकलन : मिलिंद पंडित, कल्याण*
********************************
https://youtu.be/YK29GFM8p-Q
Video link
🌻न. प. सावनेर समुह साधन केंद्र 🌻
🚺शाळापूर्व तयारी (अभिरुप) शिक्षण परिषद ( कार्यशाळा ) संपन्न झाली.
🌹कार्यशाळेचे उद्घाटक 🌹
मा. श्री सुरेश पाटील
💐💐💐
(केंद्र समन्वयक ) न. प. सावनेर यांच्या हस्ते करण्यात आले.
🥇कार्यशाळेचे तज्ञ मार्गदर्शक
💐कु. रजनी गौर
💐कु. दिपा खोब्रागडे
🚻सहभाग 🚻
🎄न. प. सर्व प्राथमिक शाळा🎄
सर्व मुख्याध्यापक व सर्व शिक्षक बालवाडीचे शिक्षिका
💐💐💐💐💐
या व्हिडिओ ला subscribe and like अवश्य करा आणि comments नक्कीच करा.
कार्यशाळा यशस्वी होण्यासाठी सर्वांचे सहकार्याबद्दल सर्वांचे आभार.
🙏🙏🙏🙏🙏
*न.प.अभ्यंकर प्राथमिक शाळेत “क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले” आणि “राजमाता जिजाऊ” यांची जयंती उत्साहत साजरी* http://maharashtranewsmedia.com/?p=27883
📰🎤🗒🖋📹📱🖥️
*पहा पूर्ण बातमी 👆🏻वरील लिंकवर क्लिक करून*
▬▬▬▬▬▬ ஜ۩۞۩ஜ ▬▬▬▬▬▬
*https://www.facebook.com/maharashtranewsmedia/*
👆🏻🖋🖋🖊✒✒👆🏻
*क्लिक करा आणि Facebook पेज ला like करा..*
👆🏻👆🏻👆🏻👆🏻👆🏻👆🏻👆🏻
▬▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬▬
*_www.Maharashtranewsmedia.com_*
अवश्य Like ;subscribe करा आमचा चैनल *महाराष्ट्र न्यूज़ मीडिया* *पोर्टल व युट्यूब चैनल*
बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क.
*संपर्क किशोर ढुंढेले मुख्य संपादक, योगेश कोरडे संपादक महाराष्ट्र न्यूज मीडिया,संपर्क सुत्र 9325243536,+97670 00200*
*🌍महाराष्ट्र न्यूज़ मीडिया🌍*
आज न.प.अभ्यंकर प्राथमिक शाळेत
*क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले* यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
यावेळी शाळेत मुलींसाठी *भाषण स्पर्धा आणि काव्य स्पर्धा* आयोजित करण्यात आली होती.सहभागी सर्व मुलींनी अतिशय सुंदर सादरीकरण केले.यात सर्वोत्कृष्ट भाषण आणि काव्य सादर करणा-या मुलींना अॅडव्होकेट श्री.भोजराज सोनकुसरे आणि तनिष्का ग्रुपच्या सदस्या सौ.सोनालीताई तुषार उमाटे यांचेकडून बक्षिस वितरण करण्यात आले.तसेच शाळेतील शिक्षिका सौ.नर्मदा संजय डवरे ,प्रणोती प्रफुल सहारे यांनीही आपल्या कवितेतून सावित्रीबाई फुले यांना मानवंदना दिली.
कार्यक्रमाच्या अध्यया सौ.अनिता गणेश झाडे यांनी स्पर्धात्मक कार्यक्रमातुन विद्यार्थ्यांचा कसा सर्वांगीण विकास होतो याबाबत मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे संचालन श्री.माणिक वामन रामटेके सर यांनी तर आभारप्रदर्शन सौ.नर्मदा डवरे मॅडम यांनी केले.यावेळी जेष्ठ शिक्षक श्री.सुरेश एन.गजभे,सौ.ज्योती जे.घोडाम,कु . तनुजा तु.नंदेश्वर,कु.दिप्ती डी.खोब्रागडे,कु.प्रणोती सहारे,कु.प्रज्ञा बागडे,कु.अंजली पगारे , अनुसया नारेकर (शिपाई),विजुताई श्रीवास्तव (शिपाई) यांनी सहकार्य केले.